मुंबईः रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या संपावेळी मराठी रिक्षाचालकांना कोणी अडवले तर आम्ही त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा देणाऱ्या अमित ठाकरे यांची गुणरत्न सदावर्ते यांनी खिल्ली उडवली आहे. राज ठाकरेंची औलाद काय भाषा बोलते, मारुन काढू… अमित ठाकरे हवालदार झालेत का? त्यांचे बोलणे सुज्ञपणाचे नाही. तुम्ही हवालदार झाला आहात की आरटीओचे शिपाई झाला आहात? अमित ठाकरे यांना मारहाणीचा बॅच मिळालाय का? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या परिवहन खात्याच्या निर्णयावर टीका केली. रिक्षाचालकांना रिक्षावाला नाही, रिक्षावाले साहेब बोला. कोणी कुठे राहावं आणि कुठे पोट भरावं हे सांगणारे तुम्ही कोण? तुमच्या पोटाच्या भरतीसाठी ईडी यंत्रणा लागतात का? माहिती नाही. मात्र, कष्टकरी मेहनत करतात. प्रताप सरनाईक यांनी कोणतीही गोष्ट गृहीत धरु नये. शिवसेनेतील लोक सरनाईक यांच्या बाजूने नाहीत. संजय निरूपमही परिवहन खात्याच्या निर्णयाविरोधात बोलले आहेत. हिंदी, मराठीवरुन काही लोकं इतरांना त्रस देऊ इच्छितात. मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यावर मारहाणीची भाषा करणारे नेते किती जणांच्या घरी जातात? आम्ही कष्टकऱ्यांच्या बाजूने उभे आहोत. त्यांच्यावर कोणीही हात उचलायचा नाही. अन्यथा कोणीही सुटणार नाही, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
एखादी भाषा शिकण्यासाठी गोडवा लागतो. सध्याच्या राजकीय परिस्थितीत तो गोडवा नाही. छडी मारुन माणसाला शिकवता येत नाही. प्रताप सरनाईकांना काय बोलावे, ते परिवहन खात्याचे नव्हे तर शालेय शिक्षण विभागाचे काम करत आहेत. भोजपुरी भाषा ही शेड्यूल 10 मध्ये टाकावी, ही आमची मागणी आहे. मराठी भाषेच्या सौंदर्याबाबत कोणाचंही दुमत नाही, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.
दरम्यान, मनसे पदाधिकाऱ्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना गुरुवारी रस्त्यावरच घेरून विरोध केल्याची घटना घडली होती. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना धमकीचे फोन येत आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना मराठी भाषा येत नाही का तुम्हाला? असा सवाल विचारला होता. त्यावर सदावर्ते यांनी, ‘तुला जे बोलायचं ते तू बोल… मला जे बोलायचं ते मी बोलेल’, असे प्रत्युत्तर दिले होते. या सगळ्या वादानंतर मुंबई पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्यावर महिला एवढी का संतापली; नेमकं कारण काय…