मुंबई: इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) दोन उच्चस्तरिय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार काही निर्णय जाहीर केले. या बैठकांना मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कोणकोणते निर्णय?
– मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्यात यावी. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त किंवा पोलिस अधीक्षक यांची असेल.
– मंत्री-अधिकार्यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत.
– मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा.
– मंत्री-अधिकारी यांनी आवर्जून मेट्रो आदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा.
– अधिकार्यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात.
– शासनात वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा कोटेकोरपणे आढावा घेण्यात यावा.
– ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज/फ्लेक्सवरील कारवाई वाढवण्यात याव्यात आणि तेथे डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
मंत्र्यांचे विदेश दौरे रद्द, विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको, व्हिडीओ कॉन्फर्स घ्या
– मंत्री, अधिकार्यांचे विदेश दौरे रद्द
– अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको
– बहुतेक बैठका या व्हीसीने करा!
– मंत्री, अधिकार्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरा
– उच्चस्तरिय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्णय
दरम्यान, पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीयांना गरजेनुसारच इंधन वापरण्याचे आणि ऊर्जा बचतीचे महत्त्वाचे आवाहन केले आहे. जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा, कच्च्या तेलाची बचत करण्यावर जास्तीत जास्त भर द्या, पुढील वर्षभर सोन्याची खरेदी टाळण्याचा प्रयत्न करा, विदेशी वस्तू नाकारून जास्तीत जास्त स्वदेशीचा वापर करा, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.