बीड : देवाभाऊ म्हणजे कामधेनू आहेत, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत आहेत अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी बीडमधल्या कार्यक्रमात आपल्या भावना मांडल्या होत्या. त्यांना आपल्या मनातील इच्छा माहीत असल्याने जास्त बोलू नको, असा निरोप मुख्यमंत्र्यांनी दिल्याची पुष्टीही धनंजय मुंडे यांनी जोडली. धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या डोक्यात टपली मारली. त्यामुळे मुंडेंच्या या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.
परळीतील महापशुधन एक्सपोच्या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी परळीत आले होते. याच व्यासपीठावर पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. त्यावेळी भाषण करत असताना धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणीस यांचा उल्लेख कामधेनू असा केला. आपल्या भाषणाच्या शेवटी मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली. ते म्हणाले की, ‘मी त्यांना आधीच कामधेनू म्हटलं आहे, म्हणजे आमच्या मनातल्या इच्छा तुम्हाला माहीत आहेत. म्हणून जास्त बोलू नको असा त्यांचा निरोप आला. त्यांनी आतापर्यंत आपल्याला जे दिलं त्याबद्दल त्यांचे आभार. आमच्या मनातल्या इच्छा तुम्हाला माहीत आहेत.’ धनंजय मुंडे यांचे भाषण संपल्यावर बसत असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या डोक्यात टपली मारल्याचं दिसून आले.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. त्यावेळी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर धनंजय मुंडे हे आता त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी केलेलं हे वक्तव्य अतिशय बोलकं ठरत आहे.
Video: राहुल नार्वेकर हाणामारी कुठे झाली हे तुम्ही सांगताय की मी सांगू…
चर्चांना उधाण! देवेंद्र फडणवीस एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्लीत…