दिल्लीतून डरकाळी! मुंबई पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया थेट राहुल गांधींसोबत…

riya-ahir-rahul-gandhi
Share

नवी दिल्ली : पोलिसांकडून कारवायांचा त्रास होत असलेल्या देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांनी आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांची बेकायदेशीर अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांची व्हॅन अडवलेली रिया अहिर हिने राहुल गांधी यांच्यासमोर तिला होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली.

रिया अहिर म्हणाली, ‘तुम्ही मला मुंबई पोलिसांची गाडी अडवली म्हणून ओळखत असाल पण मी असे म्हणेन की २० विद्यार्थ्यांना बेकायदेशीर अटक होण्यापासून मी रोखले होते. आपल्या माध्यमांनी आणि लोकांनी त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. माझ्या कृत्याबद्दल (मुंबई पोलिसांची व्हॅन अडवल्याप्रकरणी) मला त्रास दिला जात आहे, मी या प्रकाराला ट्रोलिंग बोलणार नाही, याला गुन्हा असेच बोलावे लागेल. काही पक्षांचे कार्यकर्ते माझा फोटो लावून चुकीचे मेसेज फॉरवर्ड करीत आहेत. माझ्याबद्दल अत्यंत निंदनीय गोष्टी पसरवत आहेत. १४० रुपयांसाठी मी शरीर विकत आहे, असे काही जण म्हणत आहेत. माझ्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल २७ जुलैला मी गुन्हा दाखल केला होता, आज ५ तारीख आहे, माझ्या हातात अजूनही एफआयआरची कॉपी आलेली नाही.’

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

काही लोक मुलींना ना शिकू देत, ना सुरक्षित राहू देत. ज्या विद्यार्थ्यांसाठी मी पोलिसांच्या गाडी समोर उभी राहिले, ती मुले आज माझ्यासाठी उभी आहेत, असे सांगत रियाने त्यांचे आभार मानले. कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे की एकमेकांसाठी आपण उभे राहिले पाहिजे, असेही रिया म्हणाली. दरम्यान, कोवळ्या वयातील रियाची परिपक्वता, तिचे सर्वसमावेशक विचार आणि विद्यार्थी हितासाठी तिची काम करण्याची तयारी हे पाहून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भारावून गेले. रिया बोलत असताना राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते.

माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या विधानाची जोरदार चर्चा…

आयुष्यभर केसाला तेल चोपड चोपड चोपडलं, पण त्याला बुद्धी आली नाही…

Gen Z हा शब्द मला काही कळला नाही : इंदुरीकर महाराज

RSS ने फक्त शैक्षणिक संस्थाच नव्हे तर ते व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतला : राहुल गांधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *